Tuesday, February 12, 2013

जन पळभर म्हणतिल हाय हाय



जन पळभर म्हणतिल हाय हाय !
मी जाता राहिल कार्य काय?

सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल, 
तारे आपुला क्रम आचरतिल, 
असेच वारे पुढे वहतिल
होईल काही का अंतराय?

मेघ वर्षतिल, शेते पिकतिल, 
गर्वाने या नदया वाहतिल,
पुन्हा कळजि की न उमटतिल,
पुन्हा तटावर हेच पाय?

सखेसोयरे डोले पुसतिल, 
पुन्हा आपुल्या कामी लगतिला,
उठतिल, बसतिल, हसुनी खिदळतिल,
मी जाता त्यांचे काय जाय?

अशा जगस्तव काय कुढावे,
मोही कुणाच्या का गुंतावे?
हरिदुता का विन्मुख व्हावे?
का जिरावुनाये शांतित काय?

No comments:

A Song for the India We Share

There are some songs that never become irrelevant. In a few weeks, on 1 October 2026 , it will be exactly 30 years since  Hariharan and Lesl...